


पिंपरी दि. . 23, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनकार्य मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने राजनैतिक आत्मबोध आणि निवडणूक या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा पिंपरी येथे आयोजित करण्यात आली.

लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि याच केंद्रबिंदूवर आधारलेली हि कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 21 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ही कार्यशाळा पार पडली. त्यांचे सहकारी अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, कोमल खामकर हे सह मार्गदर्शक उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे आयोजन ‘ जनकार्य मंच’ आणि नरेंद्र बनसोडे यांच्या संयोजनेने पार पडले.
कार्यशाळेत सहभागींनी सत्य, अहिंसा आणि संविधान या मूल्यांच्या आधारे स्वतःच्या राजनैतिक भूमिकेचा आत्मबोध विकसित केला. निवडणूक ही फक्त मतदानाची किंवा जिंकण्या हरण्याची प्रक्रिया नसून, देशनिर्मितीतील सक्रिय भूमिकेची जाणीव सहभागींना या प्रक्रियेतून नव्याने मिळाली.
सध्या स्थितीत पैसा केंद्रित असलेली राजनीति ही राजनीति नसून सत्ता कारण आहे.या राजनैतिक परिदृश्याला आपण लोकसहभागातून बदलू शकतो हा दृष्टिकोन मंजुल भारद्वाज यांनी उपस्थित सहभागींना दिला.
मंजुल भारद्वाज यांनी लोकशाहीच्या वर्तमान स्थितीवर बोलताना स्पष्टपणे नमूद केले की,
“सहभागाशिवाय लोकशाही चालत नाही; नागरिक मागे राहिल्यावर देशही निर्णयक्षमतेपासून आणि संविधानिक मूल्यांपासून दूर गेला आहे.”
आजचा विकास भांडवलदाराभोवती केंद्रीत असून, त्यांचे नफे सुरक्षित झाल्यानंतर उरलेली विषमता आणि आर्थिक दडपशाही जनतेपर्यंत पोहोचते, ही समाजाची दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. त्यांनी यावर टीका करत म्हटले,
“संवैधानिक अधिकार खुर्चीवर बसून मिळत नाहीत; त्यासाठी जमिनीवर उतरावे लागते.”
या कार्यशाळेतून सहभागी व्यक्तींनी स्वतःच्या विचारांची पुनर्मांडणी केली,आपल्या सामाजिक–राजनैतिक भूमिकेचे आत्मपरीक्षण केले,आणि जागृत, जबाबदार उमेदवाराचा आणि नागरिकत्वाचा पाया आपल्या मनात दृढ केला.
ही कार्यशाळा नागरिकांमध्ये राजकीय सचेतना निर्माण करून लोकशाहीचा आधारभूत स्तंभ ‘ सक्रिय सहभाग’ अधिक मजबूत करणारी ठरली.
तीन दिवस वेगवेगळ्या शिबिरार्थींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेस प्रामुख्याने अजमेरा मासुळकर कॉलनीतील नागरिकांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेस प्रामुख्याने नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव, विल्यम साळवी, नासिर चौधरी, मनीष भालेराव, देविदास मुसळे, आनंद नरवाडे, कुणाल भोसले, अविनाश चौधरी, श्रीरंग सरपाते, निळकंठ ताकतोडे, सचिन कदम, नितीन देवरे रंगनाथ मोरे, राजाभाऊ बडे, राजेश जेटीथोर, शुभम गायकवाड, कैलास भालेराव, राजेंद्र तांबे, रोनिल सोनवणे,
अतिश माने, मिलिंद बनसोडे, कपिल बनसोडे आदी व इतरही शिबिरार्थी सहभागी झाले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
