


पिंपरी, ता. १७ : बहुजन विकास आघाडी महाराष्ट्र राज्य मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे सांगता येत नसले तरी भाजपा पक्षाने मात्र मातंग समाजाला मंत्री मंडळात स्थान न देता एक प्रकारे मातंग समाजावर अन्याय केला आहे.त्यामुळे संपर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या भावना दुखावल्या असून होऊ घातलेल्या महानगरपालिका ,जिल्हा परिषद पंचायत समिती ,बाजार समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत.

आशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांमध्ये भाजपाला मातंग समाजाचा मोठा फटका बसू शकतो ,असे बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल यांनी भाकीत केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने घाटकोपर येथील चिरागनगर मध्ये असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या राहत्या घराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला.त्यासाठी राज्यमंत्री दर्जाची समितीही गठ्ठीत केली.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्या महायुतीच्या सरकारने मातंग समाजाची अस्मिता असलेले क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे येथील समाधीस पुणे मनपा कडून जागा उपलब्ध करून दिली.
त्यासाठी सुमारे शंभरकोटी रुपयांचा निधी जाहीर करून त्याचे भव्य उदघाटन केले.एवढेच नव्हे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) च्या धर्तीवर ( आर्टी ) म्हणजेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्माण केली.तसेच मातंग समाजाला अबकड अंतर्गत (स्वतंत्र ) अरक्षण मिळणे कामी समिती नियुक्त केली.
मुंबई येथील मंत्रालया शेजारी असलेल्या चौकाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे नामकरण करण्यात आले. आशा अनेक योजना जाहीर करून महाराष्ट्रातील मातंग समाजाला महायुतीने विशेषता भाजपाने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला,आणि तो यशस्वीही करून दाखवला.*मातंग समाजाने भरघोस मतदान करून भाजपा च्या उमेदवारांना विजयी केले*विधानसभा २०२४ च्या निवडणूका मध्ये महायुती सरकारने जाहीर केलेल्या सकल मातंग समाज हिताच्या सर्व योजना पूर्णत्वास येतील ,व त्या याव्यात यासाठी मातंग समाजाच्या समस्या ,त्यांची सामाजिक रचना ,एकंदरीत मातंग समाजाचा अभ्यास असणाऱ्या प्रतिनिधींस मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्यास समाजहितासाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना पूर्णत्वास नेहण्यासाठी मातंग समाजाच्या प्रतिनिधीस मंत्रिपद मिळणे आवश्यक आहे.
यासाठीच महाराष्ट्रातील संपूर्ण मातंग समाजाने एकजूट करून महायुतीच्या विशेषता भाजपा च्या उमेदवारांना भरघोस मते देऊन विजयी केले.*मंत्रिमंडळात मातंग समाजाला स्थान नाही*नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सायंकाळी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.या मध्ये मातंग समाजाच्या नेतृत्वाला कुठेही मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही.
त्यामुळे या मंत्रिमंडळ शपथविधी प्रक्रियेत मातंग समाजाला डावललेलं असल्याची भावना मातंग समाजमनात निर्माण झाली असून महाराष्ट्रभर याचे पडसद पडले असून मातंग समाजातून तीव्र स्वरूपात संताप व्यक्त केला जात आहे.महायुती विसशेषता भाजपाने मातंग समाजावर अन्याय केला असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजात भाजपा विरुद्ध संतापाची लाट उसळू लागली आहे.आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेषतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती व भाजपा च्या विरोधात पडसद पहायला मिळतील हे निश्चित आहे.
मंत्रिमंडळात स्थान दिले असते तर ..
महायुती विशेषतः भाजपा सरकारने मातंग समाजाच्या प्रतिनिधींशी मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले असते,तर भाजपा सरकारने मातंग समाज हिताच्या व उद्धार करणाऱ्या ज्या ज्या योजना जाहीर केल्या होत्या ,त्या पूर्णत्वास जाऊन खऱ्या अर्थाने मातंग समाजाचा उद्धार झाला असता.त्यातच मातंग समाजाच्या सर्वसामान्य कुंटुंबतील एखादा तरुण प्रशासकीय अधिकारी होऊन तो आपल्या समाजाचा उद्धार करील यासाठी भाजपा सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे म्हणून मातंग समाज एकवटला आणि महायुती विशेष भाजपाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले.
महायुतीने मातंग समाजच्या युवा नेतृत्वास विधान पिरिषदेत संधी दिली. परंतु मातंग समाजाच्या प्रतिनिधीला कुठे तरी मंत्रिमंडळात स्थान दिले असते तर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत फडणवीस सरकारला नक्कीच फायदा झाला असता ,असे मत अनेक जानकर व्यक्त करू लागले.आहेत.परंतू फडणवीस सरकारने मातंग समाजाला मंत्रिमंडळात स्थान न देता मातंग समजला डावलले आहे.महायुतीने जाहीर केलेल्या योजना या फक्त निवडणुकी पुरत्या होत्या.त्या केवळ भूल थापा होत्या.निवडणुकीच्या मतदाना पुरता भाजपने मातंग समाजाचा वापर केला आहे.अशा प्रकारे भाजपाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येतील असे बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपा ला मतदान केले .मातंग समाज वर्षानुवर्षे भाजपमध्ये काम करीत आहे .राज्यात अनुसूचित जातीची दुसऱ्या स्थानी असणाऱ्या समाजाला भाजपसह सर्वच पक्षांनी डावलले असून या समाजाचा रोष आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार आहे.
मातंग समाजातील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी व प्रमुख नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .मातंग समाज विशेष करून भाजपा च्या पाठीशी खंबीरपणे कायम उभा राहिला आहे .परंतु भाजपाने मातंग समाजाला मंत्रिमंडळात स्थान न देऊन समाजाचा अपमान केला असल्याची भावना मातंग समाज व्यक्त करीत आहे .लवकरच राज्यभर मातंग समाज मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्याची शकता वर्तवली जात आहे .त्यामुळे आगामी निवडणुकामध्ये मातंग समाज आपली राजकीय भूमिका काय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
