


पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स असोसिएशनकडून ठोस भूमिका

पुणे/ पिंपरी चिंचवड, ता. २४: महावितरण प्रशासनाने “टी ओ.डी.” मीटर सर्व विज ग्राहकांना बसविण्याचे आदेश दिले. याकरिता कोणत्याही नागरिकांच्या सूचना व हरकत न घेता हे आदेश काढलेले निदर्शनास आले आहेत. परिणामी, या आदेशावर ग्राहकांचा वाढता रोष दिसत असून अशा एकतर्फी निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ज्या ठिकाणी मीटर बसवलेले आहेत असे नागरीक त्रस्त झालेले आहेत. याबाबत पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल असोसिएशनकडे महावितरणाच्या तक्रारी येत आहेत. याबाबतचा खुलासा महावितरण कंपनीने देणे आवश्यक असल्याचे व्यवस्थापकीय संचालक, महावितरण मुंबई यांना एडवोकेट सुशील डूमने यांनी दिलेल्या नोटीशीद्वारे सांगण्यात आले आहे.
नोटीशी मध्ये नमूद केले आहे की, वीज ग्राहकांना “टी ओ डी” मिटर नको आहेत. ग्राहकांची कोणतीही सहमती नसताना जबरदस्तीने वीज मिटर बसविण्याची कार्यवाही सुरु आहे. अशी सक्ती ही मुलभूत गरज असलेल्या वीजेच्या बाबतीत करणे हा प्रत्येक नागरिकाला दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकाराचा भंग आहे
भांडवलदारी पध्दतीने काम करत असलेल्या ठराविक एका कंपनीलाच वीज मिटर बसविण्याचा दिलेला ठेका शंकास्पद आहे. सदर कंपनीच्या सांगण्यावरून अशा प्रकारचे कार्य करत असल्याचे प्राथमिक दृष्ट्या भासित होत आहे. याबाबत सगळ्या नागरीक, उद्योजक, आणि व्यापारी वर्ग यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण असून अनेक ठिकाणी या विरोधात आंदोलने आणी विरोध होत आहेत त्याची कुठलीही दखल महावितरण कडून घेतली गेलेली नाही . जे महावितरण सारख्या सार्वजनिक कंपनीला अशोभनिय आणि प्रतिमा मलीन करणारे आहे.
“टी.ओ.डी. “मिटर लावल्याने वीज ग्राहकांची बिले चार ते पाच पटीने वाढलेली आहेत. ग्राहकांमध्ये सरकारविरोधात प्रबळ भावना आणि जनक्षोभ आहे, एकंदरीत ग्राहकांची लूट करण्याचा माहावितरणाचा हा डाव असून संगठीत पध्दतीने महावितरण, मीटर बसविणारी कंपनी आणि सरकार हे मिळून लूट करत आहेत अशी जनभावना आहे.
ठराविक कंपनीचेच मीटर बसवावे अशी सक्ती करण्याचा… महावितरण्णाला कुठल्या कायदयाने अधिकार आहे ? ग्राहकांना अन्य वीज मिटर बनवत असलेल्या कंपन्याचा पर्याय न देणे ही मुस्कटदाबी असून महावितरणाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
तरी आपणांस या नोटीसीव्दारे कळविण्यात येते की, सदरची नोटीस मिळताच चार दिवसाचे आत सदर “टी.ओ.डी.” मिटर बसविण्याचे काम त्वरीत थांबविण्यात यावे, अन्यथा सर्व ग्राहकांच्या वतीने अपील दाखल करण्यात येणार असून न्यायालयात महावितरण विरूद न्याय मिळणेकामी तक्रार दाखल करण्यात येईल.
आमचे अशील एडवोकेट गिरीश बक्षी हे असोसिएशनचे अध्यक्ष असून ते विद्युत तारी निवारणाचे काम सतत पणे करत असतात .महावितरण संबधीत ज्या कांही तक्रारी असतील आणि जे नागरीक, उद्योजक, व्यापारी, त्यांच्या कडे तक्रारी घेऊन येतात ते नियमितपणे सोडविण्याचे काम ते आजतागायत करत आहेत, तुम्ही महावितरणामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असल्याने आपल्या अंतर्गत संपूर्ण राज्याच्या विज वितरणाची जबाबदारी आहे. आपले अखात्यारीत सर्व महाराष्ट्रातील महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि अन्य स्टाफ येतो. तुमच्या आदेशाप्रमाणे काम सुरू असल्याने खुलासा व्हावा.
अॅडव्होकेट..सुशीला मार डुम्ने

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
